
रत्नागिरी जिल्ह्याला तोंडाच्या कर्करोगाचा विळखा
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२५-२०२६मध्ये जिल्ह्यात विविध आरोग्य शिबिरे आणि रुग्णालयांमध्ये संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २३२ रुग्णांच्या तोंडात कर्करोगपूर्व बदल म्हणजेच पांढरे किंवा लाल चट्टे पडणे, तोंड कमी उघडणे यांसारखी लक्षणे आढळून आली आहेत.
कर्करोगाच्या रूग्याला वेळेत उपचार न मिळाल्यास या लक्षणांचे रुपांतर कर्करोगात होण्याचा मोठा धोका असतो. गंभीर जिल्ह्यातील १७ रुग्णांना कर्करोगाची लागण तपासणी दरम्यान संशयित आढळलेल्या रुग्णांच्या पुढील बायोप्सी आणि इतर चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये १७ रुग्णांना तोंडाचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या बाधित रुग्णांवर सध्या शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये पुढील उपचार सुरू करण्यात आले माहिती आली असल्याची देण्यात आली.www.konkantoday.com




