
रत्नागिरी शहरासाठी इलेक्ट्रीक मिनी बसेस द्याव्यात, आ. किरण सामंत यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
रत्नागिरी शहरातील वाहतुकीसाठी इलेक्ट्रीक मिनी बसची मागणी आमदार किरण सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीत केली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन संदर्भातील अडीअडचणी आणि समस्यांबाबत तसेच सीआरएफ फंडातून पुलांची कामे प्रस्तावित करण्यासाठी आ. किरण सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच दिल्ली येथे भेट घेतली. या वेळी लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदार संघातील तसेच राष्ट्रीय महामार्ग सुरू असणार्या विविध आणि भूसंपादन संदर्भात आ. किरण सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली.
या भेटीत ना. गडकरी यांनी तत्काळ मार्ग काढू आणि लोकांच्या समस्या सोडून त्यांना न्याय मिळवून देवू, असा शब्द त्यांनी आ. सामंत यांना दिल्याचे सांगण्यात आले. ज्या ज्या शासकीय विभागातील वाहने नादुरूस्त आहेत व त्यांच्या शासकीय जागेत बंद पडलेल्या भग्नावस्थेत आहेत. त्यामुळे त्या त्या शासकीय आवारामध्ये अडचणी झाल्या असून त्या नादुरूस्त वाहनांमध्ये शासकीय परिसरातील सुशोभित केलेली ठिकाणे अस्वच्छ दिसत आहेत, अशा वाहनांचा लिलाव करावा किंवा ती भग्न वाहने स्क्रॅपमध्ये काढण्यासाठी आपण निर्णय घ्यावा, अशी विनंती आ. किरण सामंत यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना केली.www.konkantoday.com