भाऊ भाजप सोडून का गेला? याचे आत्मचिंतन नितेश राणे यांनी करावे- संदेश पारकर.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदेश पारकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नितेश राणे यांच्यावरती जोरदार निशाणा साधला आहे.अनेक आरोप देखील आमदार नितेश राणे यांच्यावर संदेश पारकर यांनी केले आहेत. नारायण राणेंचे कडवे विरोधक म्हणून संदेश पारकर यांच्याकडे पाहिले जाते.संदेश परकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज पारकर यांनी राणेंवर जोरदार निशाणा साधला आहे. नितेश राणे स्वतःच्या भावाला आपल्या पक्षात न्याय देवू शकले नाहीत,ते कार्यकर्त्यांचे प्रवेश घेवून काय करणार? त्यांनी आत्मपरीक्षण करावे? आपला भाऊ भाजप सोडून का गेला? याचे आत्मचिंतन नितेश राणे यांनी करावे असे वक्तव्य संदेश परकर यांनी केले आहे. नितेश राणे यांना आपला पराभव त्यांच्या डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे असे अनेक प्रवेश केले जात आहेत. नारायण राणे भाजपमध्ये आल्यामुळे मूळ भाजपची वाढ खुंटली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button