
रत्नागिरी शहरातील गोळप येथे डेंग्यु सर्वेक्षणासाठी गेलेल्या कर्मचार्यांना वाईट वागणूक
राज्यात डेंग्यू प्रसाराचे प्रमाण वाढत असताना रत्नागिरी जिल्ह्यातही ते वाढतच आहे. तालुक्यातील गोळप येथील मोहल्ल्यात डेंग्यूचे ६ रूग्ण सापडल्यामुळे त्या क्षेत्रात साथ घोषित करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक उपाय सुरू असून तेथे काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांना मात्र काही स्थानिकांकडून वाईट वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. दरम्यान गोळप येथील या प्रकाराची पालकमंत्री उदय सामंत यांनी दखल घेतली असून आरोग्य कर्मचार्यांना पुन्हा अशी वागणूक मिळू नये. पूर्ण सहकार्य मिळा़वे, यासाठी आवश्यक त्या सूचना गावस्तरावरील प्रशासकीय कर्मचार्यांनाा दिल्या.या संदर्भात जिल्हा मलेरिया अधिकारी डॉ. यादव यांनी सांगितले की, गोळप मोहल्ला येथे एका लग्न समारंभाला विविध ठिकाणांहून व्यक्ती एकत्र जमल्या होत्या. यातून डेंग्यूचा रूग्ण सुरूवातीला आला.या परिसरात आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून साठलेले पाणी हटवण्यासाठी सुचना देत होते. स्वच्छता करण्यासाठी आवश्यक त्या सूचना कर्मचारी देत होते. त्यांचे काम काही लोकांना आवडले नाही. त्यांनी आरोग्य कर्मचार्यांना वाईट वागणूक दिल्याचे समजते. काही लोकांनी आरोग्य कर्मचारी आल्यात म्हटल्यावर वस्तू फेकल्या तर काही लोक आरोग्य कर्मचार्यांवर चक्क थुंकल्याचे समजते. www.konkantoday.com