
देवरूख-रत्नागिरी मार्गावरील क्रशरमुळे पांगरी घाटातील वाहतूक धोकादायक
देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पांगरी घाटात असलेल्या स्टोन क्रशरमुळे तसेच दिवसाढवळ्या होणार्या ब्लास्टिंगमुळे मार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. पावसाळ्यात दरडी खचून मार्ग बंद होणार नाही ना अशी भीती व्यक्त होत आहे. याकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.देवरूख-रत्नागिरी हा महत्वाचा मार्ग आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी याच मार्गाचा वापर करतात. याच मार्गावर पांगरी घाट आहे. पांगरी घाटात असलेल्या स्टोन क्रशरमुळे तसेच दिवसाढवळ्या होणार्या ब्लास्टिंगमुळे मार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे.www.konkantoday.com