
पावसाळ्यात महामार्गावर २४ तास दक्ष रहाण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निर्देश
मुंबई-गोवा महामार्गावरील पॅकेज १ ते १० च्या सध्याच्या कामाच्या स्थितीसह प्रगतीचा सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी महामार्ग पाहणी दौर्यादरम्यान बुधवारी पेण येथे आढावा बैठक घेतली. महामार्गावर पावसाळ्यात २४ तास दक्ष राहण्याचे निर्देश देत महामार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेशही अधिकार्यांना दिले.रखडलेल्या महामार्गाच्या कामांमुळे सर्वच स्तरातून टीकांचा भडीमाग सुरू आहे. महामार्गाचे काम पूर्ण करण्याच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. यंदाच्या गणेशोत्सवातही चाकरमान्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री रविंद्र चव्हाण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या दौर्यावर आले आहेत. पेण येथे राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकार्यांसह अन्य खात्यांच्या अधिकार्यांसमवेत बैठक झाली.मंत्री चव्हाण यांनी पावसाळ्यात महामार्गावर कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकार्यांना केल्या. पावसाळ्यात अधिकार्यांच्या पथकांनी २४ तास सतर्क रहायला हवे. मुसळधार पावसामुळे महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत ते खड्डे तातडीने बुजवून वाहनचालकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सुचनाही अधिकार्यांना दिल्या. www.konkantoday.com