नारायण राणे यांची उद्धव ठाकरे वर जोरदार टीका, संजय राऊत मूर्ख माणूस असल्याची टीका.

मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि त्याच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली.नारायण राणे यांनी आरोप केला की, उद्धव ठाकरे यांचं कार्य केवळ विरोधकांना शिव्या घालणं आणि चांगल्या कामात अडथळा आणणं एवढंच मर्यादित आहे. विकास आणि समृद्धी यासाठी त्यांनी काहीच केलेलं नाही.

पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंचा पक्षच अस्तित्वात राहणार नाही, असा दावा करत त्यांनी थेट राजकीय भविष्यवाणी केली.”बाळासाहेब गेले आणि शिवसेना संपली”राणे यांनी आपल्या ३९ वर्षांच्या शिवसेना प्रवासाचा दाखला देत सांगितले की, जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा शिवसेना एक विचारधारा असलेला मजबूत पक्ष होता. मात्र, बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षाची ओळखच संपली असून उद्धव ठाकरेंनी त्या वारशाला योग्य न्याय दिला नाही, अशी टीका त्यांनी केली.संजय राऊतवरही सडकून टीका संजय राऊत यांच्यावरही नारायण राणेंनी जोरदार निशाणा साधला. त्यांनी म्हटले, “संजय राऊत सकाळी उठल्यावर घराबाहेर मीडियाशी बोलतो आणि तेच त्याचं दुकान आहे.” राऊत यांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा हिशोब द्यावा – देश, राज्य किंवा स्वतःच्या गावासाठी काय योगदान दिलं आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं, असं आव्हानही राणेंनी दिलं.त्यांच्या कोणत्याही विधानाला उत्तर देण्यास आपल्याला वेळ नाही, असं सांगत राणेंनी राऊत यांना ‘मूर्ख माणूस’ म्हणत वाद अधिकच गहिरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button