आंबा बागायतदारांना १०० टक्के कर्जमाफी द्या, जिल्हा आंबा उत्पादक शेतकर्‍यांची मागणी.

रत्नागिरी जिल्ह्यात मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे आंबा बागांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे बँकांचे कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न येथील बागायतदार, शेतकर्‍यांसमोर उभा आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्‍यांचे शंभर टक्के कर्ज माफ करावे, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित जिल्हा रत्नागिरी, कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेते सहकारी संस्था रत्नागिरी, पावस परिसर आंबा उत्पादक संस्था, आडिवरे, मंगलमूर्ती संघ व करबुडे रवळनाथ संघ, ता. जि. रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे आंबा नुकसान भरपाई मिळावी, यासाठी निवेदन देण्यात आले. अप्पर जिल्हाधिकार्‍यांकडे नुकसानीची सविस्तर माहिती प्रकाश साळवी यांनी दिली. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेले आंबा उत्पादन ७५ टक्क्यापेक्षा जास्त पावसात भिजून नष्ट झाले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button