
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जयगड खाडीवर ७१५ कोटींचा ’केबलस्टेड’ पूल उभारला जाणार.
महाराष्ट्र सज्य रस्ते विकास महामंडळाकडून समुद्री महामार्गादरम्यान ७१५ कोटीचा भव्य ’केबलस्टेड’ पूल उभारण्यात येणार आहे. गुहागर तालुक्यातील तवसाळ ते रत्नागिरी तालुक्यातील जयगड हे समुद्री अंतर पार करणे, या पुलामुळे सहजशक्य होणार आहे. तसेच मुंबईतील वरळी सिलींकप्रमाणे या जयगड खाडीवरील केबलस्टेड पुलामुळे येथील समुद्री महामार्गाच्या सौंदर्यात भर पडणार आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रेवस ते रेड्डी असा ४९८ किलोमीटर लांबीचा समुद्री महामार्गाचा प्रकल्प हाती घेतला आहे. या समुद्री जयगड खाडीवरील प्रस्तावित ’केबलस्टेड’ पुलाचा आराखडा, महामार्गामुळे सयगडच्या किनारपट्टीचा भाग तसेच पुढे रत्नागिरी तालुक्यातील काही महत्वाच्या खाड्या आणि पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी गाव अशा हा सागरी महामार्गासाठी ७ हजार ८५१ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या सागरी महामार्गावर रेवस, धरमतर, कुंडलिका, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड, आणि कुणकेश्वर असे ७ पूल उभारण्यात येणार आहेत.www.konkantoday.com