मंत्री उदय सामंत यांच्याकडून मिऱ्या बंधाऱ्याची पाहणी


राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरी दौऱ्यावर असताना पांढरा समुद्र मिऱ्या बंधाऱ्याची पाहणी केली. त्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना बंधाऱ्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

हा बंधारा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, तो जनतेसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे. रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सुविधेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे यानिमित्ताने मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button