चेंबूरमध्ये चाळीतील घराला भीषण आग! एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू! दोन चिमुकल्यांचाही समावेश!!

चेंबूरच्या सिद्धार्थ नगर परिसरात चाळीतील एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन चिमुकल्यांचादेखील समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले.*मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेपाचच्या सुमारास ही आग लागली. घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितलं जात आहे. या घरात गुप्ता कुटुंबिय राहत होते. ते पहाटे झोपेत असताच ही घटना घडली. या आगीत गुप्ता कुटुबांतील पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. प्रेम गुप्ता (३०), अनिता गुप्ता (३०), मंजू गुप्ता (३०), परीस गुप्ता (७) आणि नरेंद्र गुप्ता (१०) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button