
अर्धवट कामामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गडगडी धरण कृती समितीचा जल आक्रोश मोर्चा
गडगडी धरणाच्या अर्धवट कामाकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी, मागण्यांची शासनाने गंभीर दखल घेण्यास व त्या लवकरात लवकर मंजूर करण्यास भाग पाडण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाचे आगामी पावसाळी अधिवेशन डोळ्यासमोर ठेवून गडगडी धरण कृती समितीच्यावतीने २ जुलै रोजी सकाळी १० वाजता देवरूख येथे जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष संतोष घाग यांनी दिली.देवरूख शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथून जल आक्रोश मोर्चाला सुरूवात होणार आहे. संपूर्ण देवरूख बाजारपेठेतून मार्गक्रमण करण्यात येणार आहे. शेवटी देवरूख येथील जलसंपदा विभाग, तहसीलदार व अन्य कार्यालयात याचे निवेदन देण्यात येणार आहे.www.konkantoday.com