
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम ते असुर्डे दरम्यान महामार्गाच्या कामापूर्वी सुमारे २२ हजार वृक्षांची तोड
मुंबई-गोवा महामार्गालगत गतवर्षी करण्यात आलेल्या कमी वृक्ष लागवडीबाबत नाराजी व्यक्त करत यावर्षी ५० टक्के वृक्ष लागवड करा, अशा सूचना आमदार शेखर निकम यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत ठेकेदार कंपनी व अधिकार्यांना दिल्या आहेत.या बैठकीत अनेकांनी मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम ते असुर्डे दरम्यान महामार्गाच्या कामापूर्वी सुमारे २२ हजार वृक्षांची तोड करण्यात आली आहे. त्या बदल्यात ठेकेदार कंपनीने दहा टक्केही लागवड केलेली नाही. असे आमदार शेखर निकम यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे निकम यांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत चिंता व्यक्त केली. वृक्ष लागवडीबाबत ठेकेदार कंपनी अपयशी ठरली आहे. याचा विचार करून या वर्षाच्या पावसाळ्यात तोड झालेल्यांपैकी ५० टक्के वृक्ष लागवड व्हावी व नियोजनबद्ध करून जगली पाहिजेत, अशा सूचना निकम यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार कंपनीला दिल्या. तसेच पयांवरण प्रेमी शौकत मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीत वृक्षलागवडीसंदर्भात लवकरच ग्रामसेवकांची बैठक आयोजित करावी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लागवड करावी, असेही निकम यांनी सुचविले.www.konkantoday.com