
बांबूला देश-विदेशात चांगले नावलौकिक मिळवून देण्यासाठी ‘इंडिया बांबू फोरम’ या संस्थेची स्थापना-माजी केंद्रीय मंत्री खा. सुरेश प्रभू
कुडाळ -केंद्र सरकारने बांबू तोडबाबत विशेष कायदा केला असून गवतर्गीय पिकात बांबूचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता बांबूची तोड करणे अधिक सुलभ होणार आहे. त्याचबरोबर बांबूला देश-विदेशात चांगले नावलौकिक मिळवून देण्यासाठी ‘इंडिया बांबू फोरम’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. यात देशभरातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. या फोरममुळे बांबू उद्योगाला राष्ट्रीय स्तरावर अधिक चालना मिळून या क्षेत्रात मोठी क्रांती होणार असल्याचा विश्वास माजी केंद्रीय मंत्री खा. सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला.
खा. प्रभू सध्या सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर असून रविवारी त्यांनी कुडाळ एमआयडीसी येथील कॉनबॅकच्या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
www.konkantoday.com