॥ नवीन प्रयोग, नवी दिशा ॥

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’; ८००० महिला शेतकऱ्यांना मोफत कृषी किट व माती परीक्षण मार्गदर्शन!

स्थळ [जिल्हा रत्नागिरी दक्षिण ]:

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्याचे यशस्वी व लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी क्रांतिकारी ‘महिला शेतकरी बिल’ आणले. या ऐतिहासिक धोरणात्मक निर्णयावर आधारित आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिलांना शेतीत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करणारा एक नाविन्यपूर्ण प्रयोग आता प्रत्यक्षात साकारत आहे.

भारतीय जनता पार्टी भाजप प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रदादा चव्हाण यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि महिला प्रदेशाध्यक्षा आमदार चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अंतर्गत ग्रामीण भागातील ४,००० महिलांना विशेष कृषी किटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

महिला शक्तीच्या कल्पकतेला आणि शेती क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला मानाचा मुजरा देणारा हा प्रयोग महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात एक नवा इतिहास रचेल.

प्रमुख वैशिष्ट्ये व उपक्रम:

थेट माती परीक्षण प्रात्यक्षिक (Live Soil Testing): जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र (KVK), स्थानिक कृषी अधिकारी (TAO) आणि कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांमार्फत महिलांना शेतातील मातीचा नमुना घेणे व सुपीकता ओळखण्याचे थेट प्रात्यक्षिक दिले जाईल.

‘कृषी माऊली’ किट वाटप:

महिलांचे श्रम कमी करण्यासाठी एका पर्यावरणपूरक कापडी पिशवीतून प्रगत भाजीपाला बियाणे, जैविक खते, शेती उपयोगी अवजारे (खुरपे, विळा) आणि रात्रीच्या सुरक्षिततेसाठी टॉर्च दिली जाईल. या पिशवीवर सन्माननीय ‘देवाभाऊ’ यांच्या फोटोसह ‘भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश’ असे मुद्रित करण्यात आले आहे.

मा.प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली,आमदार चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त साकारत असलेल्या या भव्य सोहळ्याला सौ शर्मिला वैकुंठ पाटील जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा रायगड व परिसरातील महिला शेतकरी भगिनींनी उपस्थित रहाणार आहेत असे भाजप महिला मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे.सदरचा कार्यक्रम हा जिल्हा भाजपा कार्यालय आठवडा बाजार येथे दिनांक:- २७.०७.२०२६ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.

माध्यम संपर्कासाठी:
नाव/पद:सौ वर्षा परशुराम ढेकणे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण

मोबाईल नंबर: [9527454532]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button