प्रकल्प विरोधी दृष्टिकोन बदलला पाहिजेः किरण उर्फ भैय्या सामंत.

राजापूर-लांजा साखरपा विधानसभा मतदार संघात चांगले उद्योग आणुयात. प्रत्येक प्रकल्पाला विरोध हा नकारात्मक दृष्टिकोन बदलला पाहिजे, असे प्रतिपादन सिंधू-रत्न योजनेचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत यांनी निवसर येथील कार्यक्रमात केले.तसेच निवसर गावाला सुमारे साडेचार कोटींचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.निवसर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, शासनाच्या योजना पक्ष संघटनेमार्फत राबवण्यात येणार आहेत. निवसर गावात विकास कामे करत राहणार आहे. शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे प्रश्न सोडवणार आहोत. तालुक्यात चांगले उद्योग आणुया. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. काही नतद्रश्ट मंडळींनी प्रकल्पांना विरोध केला. रत्नागिरी जिल्ह्यात विकास करणे फार सोपे आहे. पडीक जमिन उद्योगांना देण्याची मानसिकता ठेवू. भूलथापा मारणार नाहीत, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. प्रत्येक प्रकल्पाला विरोध हा ठपका पुसून काढला पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button