
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे उंबर वाडीच्या दरम्यान कोतवडे एसटीबस चरात गेल्यामुळे अपघात
रत्नागिरी परिसरात कोसळणार्या मुसळधार पावसाचा फटका ग्रामीण भागातीलवाहतुकीला बसला आहे. रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे उंबर वाडी येथे मंगळवारी सकाळच्या दरम्यान कोतवडे एसटीबसला अपघात झाला. मुसळधार पावसात समोरील चर लक्षात न आल्यामुळे बस खड्ड्यात जाऊन कलंडली. सुदैवाने
एसटीतील एकाही प्रवाशाला इजा झाली नसल्याची माहितीमिळत आहे
www.konkantoday.com