
जिल्हा नियोजन कडून निधी वाटपात काही तालुक्यांवर अन्याय माजी आमदारविनय नातू यांचा आरोप
जिल्हा नियोजन कडून निधी वाटपात काही तालुक्यांवर अन्याय होत असल्याचा पुन्हा एकदा आरोप माजी आमदार विनय नातू यांनी केला आहे.
Kरत्नागिरी जिल्हा नियोजन समिती मार्फत राबविल्या जाणाऱ्या जिल्हा वार्षिक योजना आर्थिक वर्षात ग्रामीण रस्ते विकास या कार्यक्रमाकरीता मंजूर करण्यात आलेल्या निधीमध्ये सुद्धा फार मोठी तफावत लक्षात येते.
दोन मतदारसंघात १५ कोटी रुपये खर्च आणि तीन मतदारसंघात ८ कोटी रुपये खर्च इतकी मोठी तफावत जिल्हा नियोजनमध्ये राहीली तर या सर्वांचा परिणाम ग्रामीण भागातील विकास कामांवर होतो. या पध्दतीने कंत्राटदारांच्या भल्यासाठी निर्णय घेतले जातात असाही आरोप नातू यांनी केलाय