
हेल्पिंग हॅण्ड व रत्नागिरी पोलिसांच्यावतीने पुरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तू देणार
रत्नागिरी:कोल्हापूर-सांगली येथील महाप्रलयंकारी पुरामुळे अनेकांचे संसार, घरेदारे, गाईगुरे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या तेथील पुर ओसरला असला तरी त्या ठिकाणी चिखल सडलेले धान्य, गाई-म्हैशींचे मृतदेह पडले असून या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. अशा या लोकांना मदत करण्यासाठी आता रत्नागिरी पोलीस दल व सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. रत्नागिरीतील हेल्पिंग हॅण्ड व जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्यावतीने याआधी दुर्गम भागातील गावांना कपडे, पाणी आणि खाण्याच्या वस्तूंचे वितरण करण्यात आले होते. आता या लोकांना पुढील दृष्टीने आवश्यक असलेली जीवनावश्यक वस्तू म्हणजे रोज वापरात येणार्या साबण, टुथपेस्ट, ब्रश, वह्या, पेन अशा वस्तू व मुगडाळ, तांदूळसारखी धान्य देण्यात येणार आहेत. हा उपक्रम रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक संस्थांच्या मदतीने राबविण्यात येणार आहे. पुरग्र्रस्त लोकांच्या मदतीसाठी रत्नागिरीकरांनी अशा वस्तू देवून येथील पुरग्रस्त लोकांना मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या रत्नागिरीकरांना अशा वस्तू द्यायच्या आहेत त्यांनी टीआरपी येथील अंबर हॉल व सावरकर नाट्यगृह येथे दि. १७ व १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ४ या वेळात आणून द्याव्यात. तसेच ज्या लोकांना रकमेच्या स्वरूपात मदत करावयाची आहे त्यांनी जाणीव फाऊंडेशनच्या जनता सहकारी बँक लि. शिवाजीनगर शाखेत खाते नं. ०२३२३०१००००१३५१, IFC CODE (आयएफसी कोड) JSBP0000023 या खात्यात जमा करून मोबा. ९४२२००३१२८ या नंबरवर मेसेज किंवा वॉटस्ऍपद्वारे कळवावे. रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जाणीव फाऊंडेशन जनजागृती संघ, राजरत्न प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स, स्वराज्य संस्था आणि अनुलोम या संस्था या प्रकल्पासाठी काम करीत आहेत.
www.konkantoday.com