मिर्‍या-नागपूर महामार्गावर मोकाट गुरांमुळे वाहन चालकांच्यात भीतीचे वातावरण.

रत्नागिरी शहर व परिसरात मोकाट गुरांमुळे रत्नागिरी शहरवासियांना मनस्ताप होत असतानाच आता मिर्‍या-नागपूर महामार्गावरून देखील या गुरांचा त्रास होत आहे. रस्त्याच्या मध्येच ही गुरे ठाण मांडून बसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना ही गुरे दिसून येत नाहीत. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे वाहनांचा वेग देखील वाढला आहे. त्यातच ही गुरे अपघातांना आमंत्रण ठरत आहेत. मिर्‍या-नागपूर महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहेत. हा रस्ता शहरालगतच्या भागातून जात असल्याने शहरातील गुरांनी या रस्त्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. मिर्‍या महामार्गावर मोकाट गुरे येण्याचे प्रमाण वाढले आहे. कॉंक्रीटीकरणामुळे उब बिळविण्यासाठी ही गुरे रस्त्यावरच बसून असतात. महामार्गावर असणार्‍या या गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता सर्वसामान्य वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button