अडुर कोंडकरूळ पंचक्रोशीत विजेचा लपंडावसमस्या लवकर सोडवण्याची दीप हळ्ये यांची स्थानिक प्रशासनाकडे आग्रही मागणी.

गुहागर : तालुक्यातील अडुर कोंडकरूळ नागझरी बुदल या पंचक्रोशीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विजेचा पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पिण्याच्या पाण्याचा डीपी जळल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासमानेन यांनी या बाबत ठोस पावले उचलावीत व समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी आग्रही मागणी गुहागर तालुका बळीराज सेनेचे तालुका कार्यकारणी सदस्य व समाजसेवक दीप हळ्ये यांनी केली आहे.

अडुर येथे पहिले चार दिवस व नंतर पाच दिवस असे एकूण नऊ दिवस पिण्याचे पाणी न आल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल झाले आहेत. डीपी जळल्याने पाणी येत नाही, असे सांगण्यात येत आहे. विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने मोबाईल बंद आहेत, रेंज नाही, पंप बंद आहेत, अश्या अनेक समस्या आहेत. याचा फटका सामान्य जनतेला पडत आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर मार्ग काढाव, अशी मागणी दीप हळ्ये यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button