
येत्या ३-४ तासांत रत्नागिरीत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
रत्नागिरी : कुलाबा (मुंबई) हवामान खात्याकडून आज (८ मे) सायंकाळी ४ वाजता जारी करण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार पुढील ३-४ तासांत रत्नागिरी, पुणे, जळगाव, धुळे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांतील काही ठिकाणी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून, विजांच्या कडकडाटासह वादळी आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.