रत्नागिरी शहरालगतच्या खेडशी आणि फणसवळे येथील गावातील पाच बंद घरे फोडली.

रत्नागिरी शहरालगतच्या खेडशी आणि फणसवळे परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्रीत पाच बंद घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवार, २१ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली. खेडशी येथील विश्वास दत्तात्रय देसाई यांचे कुटुंब सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेले आहे. मंगळवारी सकाळी शेजार्‍यांनी घराचे दरवाजे उघडे असल्याचे पाहून पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता अन्य तीन घरेही फोडल्याचे निदर्शनास आले.

तसेच खेडशीजवळील फणसवळे येथेही भिकाजी माने यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले. माने कुटुंब सध्या मुंबईत वास्तव्यास असून, त्यांच्या अनुपस्थितीत घर फोडले गेले. ही बाबही शेजार्‍यांच्या लक्षात येताच ग्रामीण पोलिसांना सूचित करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला चोरट्यांनी सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.अलीकडेच बनावट पोलीस बनून दोन महिलांचे दागिने लुटल्याची घटना ताजी असतानाच, आता पाच घरफोड्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळी सुट्टयांमध्ये अनेक जण बाहेरगावी जात असल्याने चोरीच्या घटना या काळात सातत्याने घडत असल्याचे पहावयास मिळते. दरम्यान पोलिसांकडून याप्रकरणी चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button