
कोल्हापूर राजेंद्रनगर येथे काही तरुणांनी रात्रीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे केले, तणावाचे वातावरण.
कोल्हापूर राजेंद्रनगर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेजवळ मुख्य चौकात काही तरुणांनी रात्रीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभे केले. शनिवारी (दि.घटनास्थळी धाव घेऊन पुतळे हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांनी विरोध केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.राजेंद्रनगर चौकात सतीश आनंदराव घोरपडे यांची साडेपाच एकर जागा आहे. रिकाम्या जागेत झोपडपट्टीधारकांनी अतिक्रमण केले असून, रस्त्याकडेची जागा रिकामी आहे. याच जागेत अज्ञातांनी पहाटे दोन चबुतरे बांधले. सकाळी सातच्या सुमारास त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभे केले. याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणतीही परवानगी न घेता खासगी जागेत उभे केलेले पुतळे तातडीने काढून घेण्याची विनंती पोलिसांनी स्थानिकांना केली. मात्र, पुतळे न हटवण्यावर स्थानिक ठाम आहेत.