राजनसाळवी कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांच्यासोबत कुणीही जाणार नाही-जिल्हाप्रमुख विलास चाळके.

गेल्या काही महिन्यांपासून राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. मात्र, राजन साळवींनी कोणत्या पक्षात जाणार याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. दरम्यान, राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर पक्षातील स्थानिक नेत्यांनी राजन साळवींवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केलीये. ज्यांना गद्दार बोलले त्यांच्यासोबत साळवी जातील असं वाटत नाही; राजन साळवी हे निष्ठावान शिवसैनिक आहेत. राजन साळवी यांना पाच वेळा एबी फॉर्म दिला आणि तीन वेळा आमदार म्हणून पक्षाने निवडून आणलं.

राजन साळवी कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांच्यासोबत कोणीही कार्यकर्ता जाणार नाही, असा विश्वासही जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी व्यक्त केला. राजन साळवी हे निष्ठावान शिवसैनिक आहेत. त्यामुळे ज्यांना गद्दार बोलले त्यांच्यासोबत राजन साळवी जातील असं वाटत नसल्याचं शिवसेनेचा ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विलास चाळके यांनी म्हटलं आहे. तसेच भाजप आणि त्यानंतर शिंदे शिवसेना त्यांच्यासोबत जाण्याची वेळ आणि राजन साळवी यांची फरपट का होते? याचा विचार देखील साळवी यांनी करावा असा घरचा आहेर देखील चाळके यांनी दिला आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर केवळ दुसऱ्याच दिवशी राजन साळवी यांनी भाजपची चाचपणी सुरु केली होती. त्यामुळे हा मोठा धक्का आम्हाला बसला होता असं देखील चाळके यांनी म्हटलं असून साळवी कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांच्यासोबत कुणीही जाणार नाही, अशी टीका देखील चाळके यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button