
गुहागर तालुक्यातील रानवी येथील कातळ सड्यावर सहा कातळशिल्पांच्या प्रतिकृती आढळल्या.
निसर्ग संरक्षणासाठी गेल्या वर्षापासून धडपडत असलेल्या येथील सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेच्या तीन सदस्यांना जंगल भ्रमंतीदरम्यान गुहागर तालुक्यातील रानवी येथील कातळसड्यावर एक नव्हे, दोन नव्हे तब्बल सहा कातळशिल्प प्रतिकृतीच्या पाऊलखुणा दिसून आल्या. एकाच भागात दोन ठिकाणी प्रत्येकी तीन त्याही वेगवेगळ्या रूपात सापडलेल्या तब्बल ६ प्रतिकृतींमुळे कातळशिल्प संशोधकांना संशोधनासाठी इतिहासाचा आणखी एक खजिना सापडला आहे.
सध्या संस्थेसह पुण्यातील अभ्यासकांच्या माध्यमातून या कातळशिल्पांचा अभ्यास सुरू आहे.अवघ्या महाराष्ट्रात निसर्ग संरक्षण, पर्यावरण, वन्यजीवरक्षण, वणवामुक्ती जंगल पर्यटन याशिवाय आदिवासी पाड्यांच्या अडचणीत धावणार्या सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेच्या सफद कडवेकर, राणी प्रभुलकर आणि शुभम कुरधुंडकर यांचे काम मोठे आहे. गेल्या अनेक वर्षापासून सह्याद्रीच्या खोर्यात ते निसर्ग संरक्षण आणि वन्यजीवांसाठी धडपडत आहेत.www.konkantoday.com