
जयगड समुद्रात इंधनसाठा जप्त; ‘शहाना’ बोटीसह पाच जण ताब्यात
जयगड समुद्र परिसरात रत्नागिरी कस्टम विभागाने धडक कारवाई करत ‘शहाना’ नावाच्या मच्छिमारी बोटीवरून ३० हून अधिक इंधनाचे बॅरल जप्त केले. मच्छिमारी हंगाम संपत असताना एवढा मोठा इंधनसाठा आढळल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
संबंधित बोट चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली असून, बोटीवरील पाच जणांनाही चौकशीसाठी रत्नागिरी येथे आणण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कस्टम विभागाकडून सुरू आहे.


