चौपदरीकरण वाहनांच्या चौकशीची संगमेश्‍वर ग्रामस्थांची मागणी.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामाबद्दल तसेच डंपर तसेच इतर वाहनांतून भरगच्च माल भरून वाहतूक करणार्‍या गाड्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी लवकरच संगमेश्‍वरमधील ग्रामस्थ व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेवून आपली कैफियत मांडणार आहेत.

गत पंधरा दिवसात संगमेश्‍वर परिसरात चौपदरीकरणाचे काम करणार्‍या ठेकेदार कंपनीच्या डंपरनी सहापेक्षा अधिक गंभीर अपघात केले असून या डंपरवरील चालक अनुभवी नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली बारा वर्षे रडतखडत सुरू आहे. सध्या संगमेश्‍वर दरम्यान चौपदरीकणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. मात्र हे करताना अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button