“वाचाल तर वाचाल” ही संकल्पना मनात ठेवून तीन समविचारी मित्रांनी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना भेट म्हणून दिली धमाल गोष्टींची पुस्तके.

संगमेश्वर :- शालेय जीवनात वाचनाची विशेष गोडी लागावी म्हणून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची गोष्टींची पुस्तके दिली जातात. तसा पुरक उपक्रम राज्य शासन राबवित असले तरी वाचनाची गोडी आणि पुस्तकांची जाडी(पुस्तकांच्या पानांची संख्या)हा विषय तसा संशोधनाचा!समविचारी मित्र मंडळींनी बालवयात वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन प्रेरणा मिळावी यादृष्टीने एक पाऊल टाकले आहे.

सायले गावाचे सुपुत्र रुपेश मनोहर कदम, उमरे गावाचे सुपुत्र मंगेश बाईत, मुचरी गावाचे सुपुत्र जी. झेड. टोपरे या समविचारी मित्रांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.रुपेश मनोहर कदम यांनी जिल्हा परिषद शाळा सायले येथे गोष्टींची दोनशे पुस्तके दिली. त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अनामिक तेज, उत्सुकता, कुतुहल असे अनेक भाव सहज दिसून आले अशाच सेवाभावनेतून उमरे गावाचे सुपुत्र मंगेश बाईत यांनी देव धामापूर जिल्हा परिषद शाळेला, तर जी. झेड.टोपरे यांनीशृंगारपूर जिल्हा परिषद शाळेला गोष्टींची पुस्तके भेट म्हणून दिली आहेत.चॉकलेट ते थेट चंद्रापर्यंतच्या गोष्टींचा खजिना या पुस्तकांच्या संचात आहे.पुस्तके माणसाच्या आयुष्यात दिपस्तंभाचे कार्य करतात.

पुस्तकांची गोडी लागावी,हा एकमेव हेतू नजरेसमोर ठेवून हा उपक्रम राबविला जात आहे.शाळेतील शिक्षकांनी या सेवाभावी, भविष्य सुरक्षित करणाऱ्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.वाचनाची गोडी लागावी, वाचन संस्कृती बलिष्ठ व्हावी याकरिता असे उपक्रम उद्याचे आशादायी चित्र निर्माण करतील यात शंका नाही. असा दृढ विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button