
रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे सर्पदंश झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू.
रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे सर्पदंश झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवार 27 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वा. घडली.वैभव गणपत रावणंग (28,रा.मधली रावणंगवाडी निवळी, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.रविवारी सायंकाळी वैभव रावणंग हा आपल्या घरी जात असताना कोणत्यातरी विषारी सापाने त्याला दंश केला. ही बाब त्याने आपल्या नातेवाईकांना सांगताच त्यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरु असताना रात्री 8 वा. त्याचा मृत्यू झाला.