रत्नागिरी शहरातील जुना माळ नाका येथे दुचाकी ची धडक बसल्याने वृद्धाचा मृत्यू.

रत्नागिरी शहरातील जुना माळ नाका येथे रास्ता ओलांडणाऱ्या दत्तप्रसाद वासुदेव गोडसे यांना दुचाकीने दुचाकी ने धडक दिल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघात रविवार 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास माळ नाका येथे घडला. दत्तप्रसाद वासुदेव गोडसे (७७, हे सन्मित्र नगर येथे राहणारे असून ते निवृत्त शिक्षक असल्याचे समजते ज्येष्ठ नागरीक असलेले दत्तप्रसाद गोडसे हे माळनाका ब्रीज इथून चालत जात असताना एका दुचाकीस्वाराची दुचाकी घसरून त्यांना पाठीमागून धडक बसली. या धडकेत गोडसे हे रस्त्यावर कोसळले. त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातग्रस्त दुचाकीस्वाराने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. रत्नागिरी शहरातील रस्त्यावर व आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर खडी बाहेर आली असून त्यामुळे वारंवार अपघात होत असून रत्नागिरी नगर परिषदेचे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button