रत्नागिरीत सतत बदलते वातावरण नागरिक हैराण

रत्नागिरी जिल्ह्यात गेले तीन दिवस पावसाने पाठ फिरवली आहे. मधूनच एखादी सर शिंतडत आहे त्यामुळे वातावरण कोरडे झाले असून तापमानही वाढले आहे. वाढत्या तापमानाने नागरिकही उष्म्याने त्रस्त झाले आहेत. संपूर्ण आठवड्यात पावसाने दडी मारली असून पावसाचा हा दीर्घ खंड खरीप लागवडीत चिंता व्यक्त करणारा आहे.जिल्ह्यात भाताच्या लावण्या पूर्ण झाल्यानंतर जुलै अखेरपर्यंत समाधानकारक पाऊस झाला. मात्र त्यानंतर सुरू झालेल्या श्रावणमासात पिक वाढीसाठी आणि जोपासनेसाठी आवश्यक असणार्‍या पावसाने मात्र पाठ फिरवली आहे. त्यामुळे भाताची रोपे वाढत्या उन्हाने करपण्याची भीती आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button