
कोकण विकास यात्रेला सुरूवात, कोकणप्रेमी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले
रत्नागिरी ः कोकणच्या मूलभूत प्रश्नांवर पहिले कोकण रोजगार हक्क आंदोलन होणार असून आज हातखंबा येथून त्याला सुरूवात झाली. या विकास यात्रेत संजय यादवराव, कौस्तुभ सावंत, राजू भाटलेकर, प्रल्हाद वणजू, विकास शेट्ये यांच्यासह उद्योजक, हॉटेल व्यावसायिक तसेच अनेक संस्थांचे पदाधिकारी व कोकणप्रेमी नागरिक उपस्थित होते. हातखंबा येथून मोटरसायकल तसेच चारचाकी वाहनाने ही यात्रा सुरू झाली ती मराठा मैदान व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आली. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
या आंदोलनाच्या माध्यमातून कोकणातील बेरोजगारीसोबतच मत्स्यविकास, आंबा आणि पर्यटन विकासासाठी शासनाकडून ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली. अत्यंत अडणीत असलेल्या कोकणातील रोजगार निर्मितीच्या मुलभूत प्रश्नावर, पर्यटन मत्स्यउद्योग, हापूस आंबा या विषयावर पहिले महाआंदोलन कोकण रोजगार हक्क अभियान समृद्ध कोकण संघटनेनेले आयोजित केले. तारकर्ली मालवण, रत्नागिरी, श्रीवर्धन, पालघर आणि आझाद मैदान मुंबई संपूर्ण कोकणात कोकण रोजगार हक्क परिषद आयोजित करण्यात येणार आहेत.
दि. २५ जून रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेमध्ये मुंबईतील आझाद मैदानावर कोकणातील सर्व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील आंदोलक एकत्र येवून आपली भूमिका शासनासमोर मांडणार आहेत.