दोन वर्षे उलटली तरी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी केलेल्या कामाच्या बिलांचा पत्ता नाही

* गेल्या दोन वर्षापासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी केलेल्या कामांची बिले मिळालेली नाहीत. याबरोबरच ३३ टक्के कामेसुद्धा दिली नाहीत. यामुळे अभियंते आर्थिक कोंडीत सापडले आहेत. यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनने अखेर उपोषणाचे हत्यार उपसले आहे. दि. १५ ऑगस्ट रोजी चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागासमोर हे उपोषण केले जाणार असल्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी कार्यकारी अभियंता यांना दिला आहे.महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनचे प्रदेश सचिव अभिजित जाधव व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश माटे यांनी या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांची नुकतीच भेट घेतली. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या व्यथा मांडत त्यांनी निवेदन दिले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button