जागतिक महासागर दिनानिमित्त प्लास्टीकमुक्त महासागरांसाठी रत्नागिरीत जनजागृती

जागतिक महासागर दिनानिमित्त भारतीय मत्स्य सर्वेक्षणाच्या मुंबई आणि रत्नागिरी मत्स्यविज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी प्लास्टिक कचरा विषयावर जागरूकता कार्यक्रम रत्नागिरी मिरकरवाडा बंदर येथे पार पडला. आपण सारे एकत्र येवूया, महासागराला स्वच्छ बनवुया, असे फलक झळकावत विद्यार्थ्यांनी समुद्र स्वच्छतेचा संदेश सर्वांना दिला.जागतिक महासागर दिनाचे औचित्य साधून पांढरा समुद्र भाटे, मिर्‍या येथे महासागराची पूजा तसेच समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मत्स्य महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गोविंद चौधरी, चांदणी दत्त आणि शिवकन्या सोनवणे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. यावेळी ग्लोलीटर उपक्रम आणि समुद्रातील प्लास्टिक कचरा याविषयी बोलताना भारतीय मत्स्य सर्वेक्षण मुंबई प्रमुख अशोक कदम म्हणाले, प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न सर्वांनीच करावेत. विद्यार्थ्यांनी त्यात विशेष भूमिका निभावावी, असे आवाहन केले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button