
महाडच्या चवदार तळ्यावर जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचे दहन :
महाड : शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे चवदार तळ्यावर दाखल झाले आहे. मनुस्मृती अभ्यासक्रमामध्ये घेण्याच्या विचारावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र निषेध दर्शवला आहे. त्याविरोधामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहनाचा निर्धार केला आहे. महाड पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर देखील जितेंद्र आव्हाड हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहे. अनेक आंदोलकांच्या उपस्थितीमध्ये आव्हाड यांनी मनुस्मृतीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.चवदार तळ्यावरुन राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “स्त्रीयांबाबत मनुचे विचार विकृत आहेत. मनुस्मृतीमध्ये स्त्रीयांबाबत अत्यंत घाणेरड्या शब्दांत लिहिण्यात आले आहे. उपभोग घ्या अन् सोडून द्या, अशी हीन संकल्पना मनुस्मृतीमध्ये मांडण्यात आली आहे. शुद्र अन् स्त्रीयांबाबत यामध्ये वादग्रस्त वक्तव्य आहेत. मनुस्मृती काय अन् दोन श्लोक काय? दोन श्लोक आले तर पूर्ण मनुस्मृती यायला वेळ लागला नाही. आपल्या राज्याला पुरोगामी म्हणून ओळखले जाते. काही निवडक लोक महाराष्ट्राला चार हजार पाच हजार वर्षे मागे घेऊन जात आहे. समाजातील सवर्णीय लोकांनी देखील त्यावेळी यामध्ये सहभाग घेतला होता. मात्र समाजामध्ये राजकीय तेढ निर्माण केला जात आहे. वेगवेगळ्या समाजातील लोक एकत्र येणं ही महाराष्ट्राची ओळख आहे,” असे मत जितेंद्र आव्हाड यांनी चवदार तळावर व्यक्त केलेजितेंद्र आव्हाड यांनी पुढे मनुस्मृतीमधील वादग्रस्ते वक्तव्यांचा पाढा वाचला. आव्हाड म्हणाले, मनुस्मृतीमध्ये लिहिले आहे की, विश्वाची उत्पत्ती झाल्यापासून झोपा काढणे, दागिन्यांचा मोह, बसून राहणे, काम, निंदा, द्वेष मनुने स्त्रियांना दिल्या आहेत. नट्टपट्टा करुन पुरुषांना बिघडवणे हे स्त्रियांचं काम, ज्ञानी माणसं त्या वाटेला जात नाहीत. स्त्रिया पुरुषांना कुमार्गास लावतात. मनुस्मृती चार वर्णांची निर्मिती करते आणि ती ब्रम्हदेवाने केली आहे असे सांगते, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीमध्ये वादग्रस्त असलेले श्लोक आणि त्याचा अर्थ सांगितला आहे.www.konkantoday.com