वाढत्या उष्णतेमुळे कासवांची पिल्ले बाहेर पडण्याच्या प्रक्रियेवर परिणाम

रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असून गेल्या काही वर्षांत अंडी संवर्धनाचा कार्यक्रम वनविभाग व स्थानिक कासवमित्रांच्या सहकार्याने यशस्वीपणे सुरू आहेमागील दोन महिन्यात राज्याला वाढत्या उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी तपमान 38 ते 40 अंशाच्या पुढे गेले आहे. या तीव्र उन्हाचा परिणाम कोकण किनारपट्टीवरही दिसून येत आहे. या वाढत्या उष्णतेचा परिणाम कासव संवर्धनाला जाणवू लागला आहे. दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्याच्या किनार्‍यावर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी मोठ्याप्रमाणात येत असतात. मंडणगडच्या किनार्‍यापासून राजापूरच्या टोकाला असणार्‍या माडबन, वाडावेत्ये या किनार्‍यापयर्र्त कासवे अंडी घालण्यासाठी येत असल्याची नोंद वनविभागाकडे करण्यात येत आहे. पूर्वी कासवे किनार्‍यावर अंडी घालून गेल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ अंडी शोधून ती खाण्यासाठी वापरत असत किंवा कोल्हे, कुत्रे ही अंडी फस्त करीत असत. परंतु वनविभागाकडून कासवसंवर्धन मोहीम राबवण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक कासव मित्र म्हणून तरुण वर्गाने पुढाकार घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे कासव बचाव मोहीमेला वेग आला. अगदी मच्छीमारांच्या जाळ्यात आलेली कासवेही पुन्हा समुद्रात सोडण्यात येऊ लागली आहेत.यंदा या अंडी संवर्धनाला तीव्र उन्हाळ्याचा फटका बसला असून वाढत्या उष्णतेमुळे अंडी उबवून त्यातून पिल्ले बाहेर पडण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. उष्णतेमुळे अंडी खराब झाल्याने पन्नास टक्के पिल्लांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button