आमदार भास्कर जाधव यांच्या पुढाकाराने कळवंडेसह चार गावांचा मतदानावरील बहिष्कार मागे

धरणाच्या दुरूस्तीसाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय कळवंडेसह चार गावातील ग्रामस्थांनी मागे घेतला आहे. सोमवारी आमदार भास्कर जाधव यांनी कळवंडे दत्त मंदिरात घेतलेल्या बैठकीत ग्रामस्थांची समजूत काढली. या बैठकीत धरण दुरूस्तीबाबत चर्चा झाली.गेल्या वर्षभरापासून कळवंडे धरणाची दुरूस्ती रखडली आहे. त्यामुळे सध्या कळवंंडे, रेहळ-भागाडी, कोंढे, पाचाड या चार गावांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. धरणात केवळ पाच टक्के पाणीसाठा असल्याने पाणी सोडले जात नाही. त्यामुळे सर्व गावातील विहिरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांनाही पाणी मिळणे गठीण बनले आहे.  www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button