रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या अवैध अग्नी शस्त्रांची वाढलेली संख्या चिंताजनक

रत्नागिरी जिल्ह्यात वाढत्या अवैध अग्नी शस्त्रांची वाढलेली संख्या चिंताजनक असून यापुढे जिल्हा पोलिसांकडून अवैध शस्त्र बाळगणार्‍यांवर कडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. बेकायदेशीर बंदुका, कट्टे वापरण्याचे प्रमाण वाढल्याचे जिल्ह्यात निदर्शनास येत असून त्यामुळे वन्य जीवांना तसेच मानवी जीवांना देखील धोका असल्याने जिल्ह्यात विशेष लक्ष दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग यांनी दिली.
गेल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात खेड आणि चिपळूण तालुक्यात बेकायदेशीर बंदुका आढळून आल्या आहेत. बंदुका बनविणारी टोळी खेडमध्ये पोलिसांनी पकडली आहे. अनेक बंदुका पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत, तर चिपळूणमध्ये शिकारी लोकांना पकडून त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे तसेच बेकायदेशीर बंदूक जप्त केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button