
रत्नागिरी तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीची मतमोजणी सकाळी दहा वाजता कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवन येथे सुरू
रत्नागिरी तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीची मतमोजणी आज सोमवारी सकाळी दहा वाजता कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवन येथे सुरू होणार आहे.यात ९ फेऱ्या होणार आहेत.
फेरी क्रमांक १)— ओरी,कर्ला,कळझोंडी कशेळी,काळबादेवी, पाली
फेरी क्रमांक २) —कासारी,कोतवडे कोळंबे, खानू,खेडशी गडनरळ
फेरी क्रमांक ३)— गणपतीपुळे,गावखडी, गुबंद,गोळप,
फेरी क्रमांक ४)– चवे,चांदेराई, चाफे, डोर्ले, दांडे आडम, देवूड, नांदिवडे
फेरी क्रमांक ५ )–नाखरे,नाचणे, बसणी
फेरी क्रमांक ६)– नाणीज, नेवरे,पावस भाट्ये
फेरी क्रमांक ७)– मजगाव,मिरजोळे मिऱ्या,राई,हातखंबा
फेरी क्रमांक ८)— वरवडे, वाटद, शिवार आंबेरे,सडा मिऱ्या, सैतवडे
फेरी क्रमांक ९) —सोमेश्वर
४१ ग्रामपंचायत ची मतमोजणी नऊ फेऱ्या होणार असून एक फेरी पूर्ण झाल्यावरच दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. पहिले उमेदवार बाहेर गेल्यावर दुसऱ्या उमेदवारांना आत घेतले जाणार आहे.
मतमोजणी covid-19 च्या पार्श्वभूमीवर होत असून सर्वांनी तोंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे व हात धुणे इत्यादी चे पालन करावे असा आदेश तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी शशिकांत जाधव(रत्नागिरी )यांनी आवाहन केले आहे.
www.konkantoday.com