
‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने दापोलीत ३६६ कुटुंबाना मदतीचे वाटप !
रत्नागिरी – कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात दापोलीतील माळणी,रोवले, पाडले, ईळने, आतगाव या गावांचे मोठे नुकसान झाले होते. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गावाला भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले होते तसेच त्यावेळी गावातील लोकांना मदत पुरवली होती.
प्रा.अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत ३६६ कुटुंबियांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी आनंद जाधव, सुजात प्रकाश आंबेडकर, साहिल आनंदराज आंबेडकर, अमन आनंदराज आंबेडकर, रितिका भीमराव आंबेडकर, यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com