
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोऱ्या करणारी टोळी अटकेत
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद दुकाने फोडून लाखो रुपये लंपास करणाऱ्या मुंबईतील टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केले असून त्यांनी राजापूर सावर्डा येथे चोऱ्या केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून सव्वाचार लाख रुपयांचा ऐवज व साहित्य जप्त करणेत आले आहे या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद खान , रिजवान खान , मुमताज शेख , एजाज सिद्दीकी,मदिना चाव,मुस्ताक खान सर्व राहणार कौसा मुंब्रा ठाणे यांना अटक करण्यात आली आहे
www.konkantoday.com