अ‍ॅड. दीपक पटवर्धन पारदर्शक, गतीमान कारभार करतील- बाळासाहेब माने.

अ‍ॅड. दीपक पटवर्धन हे रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदी 100 टक्के निवडून येणार आहेत. ते पारदर्शक व गतीमान कारभार करून शहराच्या विकासाला चालना देतील असे प्रतिपादन माजी आ.बाळासाहेब माने यानी केले .
यापूर्वी भाजपचे दिवंगत नगराध्यक्ष डॉ. ज. शं. केळकर, माजी नगराध्यक्ष प्रमोद रेडीज, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांच्याप्रमाणे अ‍ॅड. पटवर्धन काम करणार असल्याचे त्यानी सांगितले.
आम्ही सारे कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत.
मतभिन्नता दूर झाल्यामुळे प्रचारात सक्रिय झालाेआहाेत. भाजपची वाढ कशी होईल याकरिता आम्ही सगळे योगदान देत आहाेत.
इमानदारी, प्रामाणिकपणे आमच्या पक्षाचा झेंडा पुढे नेत आहोत.
आम्ही भाजपमध्ये काल-परवा आलो नसून रा. स्व. संघाच्या मुशीतून घडलेले व भाजपच्या विचारधारेने बांधलेले कार्यकर्ते आहोत असेही माने यानी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button