प्राणी संग्रहालय कोकणातील एक प्रमुख पर्यटन आकर्षण ठरेल-पालकमंत्री मा. ना. उदय सामंत


रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन विकासाला चालना, जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने मालगुंड येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य प्राणी संग्रहालय प्रकल्पाचा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत सविस्तर आढावा घेतला.

रत्नागिरी जिल्ह्यात मालगुंड येथे होणारा हा प्रकल्प केवळ प्राणी संग्रहालय नसून, रत्नागिरीच्या पर्यावरणीय समृद्धीचे आणि पर्यटन क्षमतेचे प्रतीक ठरणार आहे. मालगुंड परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, समुद्रकिनारी असलेला जैवविविधतेचा समृद्ध वारसा यामुळे हे प्राणी संग्रहालय कोकणातील एक प्रमुख पर्यटन आकर्षण ठरेल. यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना रत्नागिरीकडे आकर्षित करता येईल, स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळेल.

या प्रकल्पातून वन्यजीव संवर्धन, पर्यावरण जागरूकता आणि पर्यटन वृद्धी यांचा सुंदर संगम साधला जाणार असून, रत्नागिरी जिल्ह्याला एक नवी ओळख मिळणार आहे. रत्नागिरीच्या विकासात पर्यटन आणि निसर्गसंवर्धनाचा समतोल राखत पुढे जाण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असा विश्वास यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button