कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर एसटी सेवा बंद असल्याने,महामंडळाचे एकादशीचे २४ लाख उत्पन्न बुडले
रत्नागिरी जिह्यातून आषाढी कार्तिकी एकादशीनिमित्त जिल्ह्यातून हजारो भाविक दरवर्षी पंढरपूरला जातात. त्यामुळे दरवेळी रत्नागिरी विभागातून सुमारे १२५ जादा गाड्या सोडण्यात येतात. शिवाय काही भाविक दिंडी किंवा वारी घेवून पायी पंढरपूरला जातात. मात्र येताना एसटीने परततात. यामुळे एसटीला सुमारे १२ लाखांचे उत्पन्न मिळत होते. यात पुणे विभागाच्या मदतीला पाठविल्या जाणार्या ५० गाड्यांचाही समावेश आहे. मात्र कोरोना महामारीचे संकट सलग दुसर्या वर्षीही असल्याने एसटीचे सुमारे २४ लाखांचे उत्पन्न बुडाले आहे.
www.konkantoday.com