रत्नागिरीत आजपासून रंगणार नमन महोत्सव

कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील नमन (खेळे) या लोककलेची ख्याती जगभर पसरली आहे. ही नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना, शासनाचे अनुदान नसतानाही कोकणवासीय जोपासत आहेत अशा लोककलेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून नमन महोत्सवाचे रत्नागिरीत आयोजन केले आहे.या महोत्सवाला ६ मार्च पासून रत्नागिरीत प्रारंभ होणार आहे. येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात हा महोत्सव ८ मार्चपर्यंत चालणार आहे. दर दिवशी तीन नमन मंडळांचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी ७ ते १० वा. च्या वेळेत तीन नमनांचे सादरीकरण येथील रसिकजनांना अनुभवता येणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button