जिल्ह्यात काही प्रमाणावर एसटी वाहतूक सुरू झाली असली तरी एसटीची आर्थिक परिस्थिती नाजूकच
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात व जिल्ह्यात एसटीची सेवा तीन महिने पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर शासनाने घेतलेल्या निर्णयानंतर सुरक्षित अंतर ठेवून जिल्ह्यात काही भागात एसटी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. एसटीच्या क्षमतेपेक्षा निम्म्या म्हणजे जवळ जवळ २२ प्रवाशांना एसटीमध्ये प्रवेश देण्यात येतो. यामुळे एसटीला अजूनही तोट्याला सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीच्या काळात या फेर्यांनाही फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. अनेकवेळा डिझेलचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी अवस्था होती. सध्या दिवसाला फक्त साठ फेर्या होत असून त्यातून दोन लाखाचे उत्पन्न मिळत आहे. यापूर्वी जिल्ह्यात दिवसाला सुमारे साडेपाच ते सहा हजार एसटीच्या फेर्या होत होत्या व त्यातून दिवसा सत्तर लाखांचे उत्पन्न मिळत होते. यामुळे सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील एसटी विभागाला दर दिवशी ६८ लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे.
www.konkantoday.com