अणुऊर्जा, रिफायनरीला उद्धव ठाकरेंचा विरोधच, शिवसेनेच्या वचननाम्यात उल्लेख
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठाने) वचननामा प्रसिद्ध केला. यामध्ये रत्नागिरी रिफायनरी या पेट्रोकेमिकल प्रकल्पाला तसेच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्याचे घोषित केले आहे. महाविकास आघाडीपेक्षा स्वतंत्र असा वचननामा काढून या पक्षाने आपले विचार जनतेसमोर मांडले आहेत. मुंबईत वचननामा प्रसिद्ध झाल्यानंतर कोकणातील राजकीय निरीक्षकांनी त्याची दखल घेतली आहे.शिवसेना (उबाठा) स्वतंत्र असा जाहीरनामा काढला आहे. वचननामा या नावाने तो मुंबईत प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि बारसू येथील प्रस्तावित रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्याचे आश्वासन नमूद करण्यात आले आहे. दोन्ही प्रकल्प रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील राजापूर तालुक्यात येत आहेत.www.konkantoday.com