
शासनाच्या आदेशा प्रमाणे आजपासून मासेमारी बंद
शासनाच्या आदेशाप्रमाणे आता आजपासून मासेमारी बंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मिरकरवाडा, हर्णै, दाभोळ, बुरोंडी या प्रमुख बंदरांसह छोटीमोठी २७ मच्छि उतरवणारी केंद्र आहेत. यातून दरवर्षी कोट्यावधी रुपयांची उलाढाल होवून शासनाला मोठा महसूल मिळत असतो. मात्र या वर्षी हंगामाच्या सुरूवातीलाच पाऊस लांबल्यामुळे चक्रीवादळे निर्माण झाली होती. त्यामुळे मच्छिमारांचा महत्वाचा हंगाम फुकट केला होता. त्यामुळे आता मच्छिमारांना आपल्या नौका किनार्यावर आणणे भाग पडले आहे. या वर्षी मच्छिमारांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.
www.konkantoday.com