सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर वागदे डगळवाडी येथे कार चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर वागदे डगळवाडी येथे गोवा ते मुंबईकडे जाणाऱ्या कार चालकाचा ताबासुटल्याने झालेल्या अपघात कांदिवली मुंबईतील चौघ किरकोळ जखमी झाले. चौपदरीकरणातील काही त्रुटीमुळे हा अपघात झाला आहे. भरधाव वेगातील कारने अन्य तीन वाहनांना धडक दिली आहे. सुदैवाने मोठी जिवितहानी टळली आहे. हा अपघात काल सांयकाळी सहाच्या सुमारास झाला
चालक देवाशीष बनूमलिक खाडंगा हे आपल्या ताब्यातील कार घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते. यावेळी कार वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात चालकासह सौरभ अशोक अगरवाल, स्वाती अशोक अगरवाल, तन्मय देवीशीष खाडंगा सर्व रा.
कांदिवली मुंबई) हे जखमी झाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button